7. मौर्यकालीन भारत


प्र .१ खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा .

१ . सत्रपांमध्ये लढाया का सुरू झाल्या ?

उत्तर -सिकंदराच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी त्यांनी नेमलेल्या सत्रपांमध्ये लढाया सुरू झाल्या .

२ .बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने श्रीलंकेत कोणास पाठवले ?

उत्तर -बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने आपला मुलगा महेन्द्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेस पाठवले .

३ .मौर्यकाळात कोणते व्यवसाय होते ?

उत्तर -मौर्यकाळात हस्तिदंत वरील कोरीव काम ,कापड विणणे आणि रंगवणे ,धातुकाम मातीची भांडी घडवणे ,नौका बांधणी इत्यादी व्यवसाय होते .

४ .सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभावर कोणत्या प्राण्यांची शिल्पे आहेत ?

उत्तर - सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभांवर सिंह हत्ती बैल या प्राण्यांची अतिशय उत्तम शिल्पे आहेत .

प्र.२ सांगा पाहू .

१ . सत्रप -

सम्राट सिकंदर ने भारतातील जिंकलेल्या प्रदेशांच्या व्यवस्थेसाठी त्यांनी ग्रीक अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या त्यांना सत्रप असे म्हटले जाते .

२ . सुदर्शन -

गुजरात राज्यातील जुनागढ जवळ सम्राट चंद्रगुप्त मौर्याने सुदर्शन नावाचे धरण बांधले होते .

३ .देवानं पियो पियदसी -

सम्राट अशोकाने त्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ठिकाणी शिलालेख आणि स्तंभालेख कोरविले या लेखामध्ये त्याने स्वतःचा उल्लेख देवानं पियो पियदसी म्हणजे देवाचा प्रिय प्रियदर्शी असा केलेला आहे .

४ .अष्टपद -

मौर्यकाळात बुद्धिबळाला अष्टपद असे नाव होते . सोंगट्यांचा खेळ बुद्धिबळ यासारखे खेळ आवडीने खेळला जात .

प्र ३रा . आठवा आणि लिहा .

१ .चंद्रगुप्त मौर्य यांच्या साम्राज्याची व्याप्ती .

उत्तर - चंद्रगुप्त मौर्याने मगध राज्यावर स्वतःची सत्ता प्रस्थापित केली त्यानंतर अवंती व सौराष्ट्र जिंकले .तसेच अफगाणिस्तानातील काबूल कंदाहार ,हेरात हे प्रदेश आपल्या साम्राज्याला जोडले .

२ .सम्राटअशोकाच्या साम्राज्याची व्याप्ती .

उत्तर - सम्राटअशोकाचे साम्राज्य वायव्येस अफगाणिस्थान आणि उत्तरेस नेपाळ पासून दक्षिणेस कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात पर्यन्त तसेच पूर्वेस बंगाल पासून पश्चिमेस सौराष्ट्र पर्यंत पसरलेले होते .

प्र ४ था . जोड्या लावा .

अ गट
१ .सम्राट अलेक्झांडर
                           
२ . मेगॅस्थेनीस

३ .सम्राट अशोक

ब गट
 अ )सेक्युलस निकेटरचा राजदूत

ब )ग्रीकचा सम्राट

क ) रोमचा सम्राट

ड ) मगधचा सम्राट


उत्तरे - १) - ब 2 ) - अ ३ ) - ड

प्र ५ वा . तुम्हाला काय वाटते ?

१ .सिकंदरला अखेर माघार घेणे भाग पडले .

उत्तर -सिकंदर ला काही स्थानिक भारतीय राजांनी त्याच्याशी निकराचा लढा दिला तरीही पंजाब पर्यंत पोहोचण्यात सिकंदर यशस्वी झाला .मात्र या स्वारीत त्याच्या सैनिकांना फार हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या . त्यांना मायदेशी जाण्याची वेध लागले होते .त्यांनी त्याच्याविरुद्ध बंड पुकारले आणि म्हणून सिकंदरला माघार घेणे भाग पडले .

२ .ग्रीक राजांची नाणी वैशिष्ट्यपूर्ण असत .

उत्तर -ग्रीक राजांची नाणी वैशिष्ट्यपूर्ण असत कारण त्यावर एका बाजूला ते नाणे पाडणाऱ्या राज्याचे चित्र तर दुसऱ्या बाजूला एखाद्या ग्रीक देवतेचे चित्र असे . नाण्यावर त्या राजाचे नाव असे.

३ .सम्राट अशोकाने कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला .

उत्तर -कलिंग युद्धातील रक्तपात पाहून अशोकाने पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला सत्य अहिंसा इतरांप्रति दया आणि क्षमावृत्ती हे गुण त्याच्या दृष्टीने महत्त्वाचे होते .

प्र ६ वा .तुमच्या शब्दात वर्णन करा .

१ .सम्राट अशोकाची लोकोपयोगी कामे .

उत्तर - सम्राट अशोकाने प्रजेसाठी सुखसोयी निर्माण करण्यावर भर दिला .माणसांना तसेच पशूंना मोफत औषधे पाणी मिळावे अशी सोय केली .अनेक रस्ते बांधले सावलीसाठी रस्त्यांच्या दोन्ही बाजूला झाडे लावली .धर्मशाळा बांधल्या . विहिरी खोदल्या .

२ .मौर्यकालीन मनोरंजन आणि खेळाची साधने .

उत्तर -मौर्यकाळात नगरमध्ये उत्सव समारंभ साजरे होत होते त्यामध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी नृत्य गायनाचे कार्यक्रम होत .कुस्तीचे खेळ , रथांच्या शर्यती लोकप्रिय होत्या . सोंगट्यांचा खेळ बुद्धिबळ हे खेळ आवडीने खेळले जात .

प्र. ७ वा . आज युआन श्वांग सारखे परदेशी प्रवासी तुम्हाला भेटले तर तुम्ही काय कराल ?

उत्तर - आज युआन श्वांग सारखे परदेशी प्रवासी मला भेटले तर मी प्रथम त्यांचे स्वागत करीन .तुम्ही कोठून व कशासाठी येथे आला हे विचारीन .प्रवासातील अनुभव विचारीन .मी माझ्यापरीने जेवढी मदत करता येईल तेवढे मी त्याला करीन ..त्यांच्या गावाला कसे जावे ? तिकडचे राहणीमान हवामान याबद्दल माहिती विचारीन

Post a Comment

0 Comments