(सर सय्यद अहमद खान, स्वामी विवेकानंद, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे)
२) रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली
२) मोहम्मद अग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना सर सय्यद अहमद खान
३) डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना महषी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली
प्रश्न २ रा : पुढील तक्ता पूर्ण करा.
प्रश्न ३ रा : पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) भारतात सामाजिक, धार्मिक परिवर्तनाच्या चळवळी सुरू झाल्या.
➤उत्तर➤ इंग्रजी शिक्षणाच्या प्रसारासोबत नवे विचार, नवीन कल्पना, नवीन तत्वज्ञान यांचा प्रसार झाला. तसेच पाचिमात्य विचार, संस्कृती यांची भारतीयांना ओळख झाली. भारतीय समाजाचे मागासलेपण त्यांच्या अंधश्रद्धा, रूढीप्रियता, जातिभेद, उच्च-नीचतेच्या भ्रामक कल्पना, चौकस व चिकित्सक वृत्तीचा अभाव यांत आहे. याची जाणीव सुशिक्षित समाजाला होऊ लागली. देश प्रगतीपथावर नेण्यासाठी भारतीय समाजातील दोष व अनिष्ट प्रवृत्तींचे निर्मूलन करून मानवता, समता, बंधुता या तत्वांवर आधारित नवा समाज निर्माण करण्याची आवश्यकता होती. त्यामुळे भारतात सामाजिक, धार्मिक परिवर्तनाच्या चळवळी सुरू झाल्या,
(२) महात्मा फुले यांनी नाभिकांचा संप घडवून आणला.
➤उत्तर➤ ब्रिटिश सत्तेचा भारतात विस्तार झाला, त्या काळात भारतातील स्त्रियांची परिस्थिती दयनीय होती. त्या काळात विधवा स्त्रियांवर अनेक बंधने होती. त्यांची स्थिती या प्रचलित बंधनांमुळे अतिशय वाईट झाली होती. विधवांना केशवपन, धार्मिक विधीत सहभागी न होणे, रंगीत वस्त्र व अलंकार घालण्यास बंदी अशा अनेक बंधनांनी त्यांना जखडले होते. स्त्रिचे सौंदर्य केसांमुळे असते. त्यामुळे विधवांचे केशवपन करून त्यांना विद्रुप करण्याची प्रथा होती. ही केशवपनाची पद्धत बंद व्हावी म्हणून महात्मा फुले यांनी नाभिकांचा संप घडवून आणला.
४. टीपा लिहा.
(१) रामकृष्ण मिशन :
➤उत्तर➤ इ.स.१८५७ मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली. रामकृष्ण मिशनने लोकसेवेचे कार्य केले. तसेच दुष्काळग्रस्तांना मदत, रोगी, दिनदुबळ्यांना औषधोपचार, स्त्रीशिक्षण, आध्यात्मिक उन्नती या क्षेत्रांतही कार्य केले व आजही करत आहे. स्वामी विवेकानंद उत्तम वक्ते होते. त्यांनी इ.स.१८९३ मध्ये अमेरिकेतील शिकागो येथील विश्वधर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी भारतातील तरुणांना उठा, जागे व्हा व ध्येय प्राप्ती होईपर्यंत थांबू नका’ हा संदेश दिला.
(२) सावित्रीबाई फुले यांच्या स्त्रीविषयक सुधारणा :-
➤उत्तर➤ समाजातील कर्मठ लोकांनी केलेली टिका, निंदा पत्करूनही सावित्रीबाईंनी शिक्षणाचे कार्य सुरू ठेवले. भारतातल्या मुलींच्या पहिल्या शाळेतील पहिल्या शिक्षिकेने म्हणजे सावित्रीबाई फुलेंनी शिक्षण देण्याचे व्रत शेवटपर्यंत चालूच ठेवले. त्यांनी शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी व अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करण्यासाठी स्त्रियांचा आत्मविश्वास वाढविणे गरजेचे आहे हे ओळखले. काही कूर रूढी परंपरांनाही त्यांनी आळा घातला. त्यांनी ज्योतिरावांबरोबर बालहत्या प्रतिबंधक गृह समर्थपणे चालवले. केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली. पोटासाठी शरीर विक्रय करणाऱ्या बाया बापड्यांना दृष्टांच्या तावडीतून सोडवून सावित्रीबाईनी त्यांना सत्यशोधक कुटंबात आश्रयास पाठविले.
0 Comments