१) भारत सेवक समाजाची स्थापना ……………………. यांनी केली
(अ) गणेश वासुदेव जोशी
(ब) भाऊ दाजी लाड
(क) म.गो. रानडे
(ड) गोपाळ कृष्ण गोखले
➤उत्तर➤(ड) गोपाळ कृष्ण गोखले
(२) राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन …………………….येथे भरवण्यात आले.
(अ) पुणे
(ब) मुंबई
(क) कोलकाता
(ड) लखनौ
➤उत्तर➤(ब) मुंबई
(३) गीतारहस्य हा ग्रंथ…………………. यांनी लिहिला,
(अ) लोकमान्य टिळक
(ब) दादाभाई नौरोजी
(क) लाला लजपतराय
(ड) बिपिनचंद्र पाल
➤उत्तर➤(अ) लोकमान्य टिळक
(ब) नावे लिहा.
(१) मवाळ नेते ➤उत्तर➤ गोपाळ कृष्ण गोखले, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, फिरोजशहा मेहता
(२) जहाल नेते ➤उत्तर➤ लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक, बिपिनचंद्र पाल
प्रश्न २ रा : पुढील उदाहरणे सकारण स्पष्ट करा.
(१) स्वातंत्र्यलढ्यात भारतीयांची अस्मिता जागृत झाली.
➤उत्तर➤ ब्रिटिश राजवटीत अनेक भारतीय व पाश्चिमात्त्य विद्वानांनी भारतीय संस्कृतीचा अभ्यास सुरू केला. संस्कृत, फारसी आणि अन्य भारतीय भाषांमधील हस्तलिखिते तपासून त्यावरील संशोधन प्रसिद्ध केली. डॉ.भाऊ दाजी लाड, डॉ.रा.गो.भांडारकर अशा काही भारतीय विद्वानांनी प्राचीन भारतीय संस्कृतीचा सखोल अभ्यास केला. आपल्याला प्राचीन समृद्ध वारसा लाभला आहे हे समजल्याने स्वातंत्र्यलढ्यात भारतीयांची अस्मिता जागृत झाली.
(२) भारतीय राष्ट्रीय सभेत दोन गट तयार झाले.
➤उत्तर➤ भारतातील राजकीयदृष्ट्या जागृत असलेले सर्व नेते जात, धर्म, भाषा, प्रांत । सर्व भेद बाजूला सारून राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावर एकत्र येत होते. भारतीय राष्ट्रसभेची उद्दिष्टे व सनदशीर मार्गांनी चळवळ पुढे नेण्यावर जरी त्यांचे एकमत असले तरीही कार्यपद्धतीबाबत त्यांच्यात मतभेद होते. हे मतभेद तात्विक स्वरूपाचे होते. स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी शांततेच्या सनदशीर मार्गांचा पुरस्कार करणारे हे मवाळ गट व स्वातंत्र्यासाठी अधिक तीव्र संघर्ष केला पाहिजे असे मानणारे जहाल गट अशा स्वरूपाचे राजकीय चळवळीतील मतभेदांवरून भारतीय राष्ट्रीय सभेत दोन गट तयार झाले
(३) लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी करायचे ठरवले.
➤उत्तर➤बंगाल हा एक मोठा प्रांत होता. ब्रिटिशांना या प्रांताचा कारभार करणे प्रशासकीयदृष्ट्या अवघड होते. ही फाळणी करण्यामागे प्रशासकीय सोय हे कारण दिले असले तरी लॉर्ड कर्झनचा मुख्य हेतू हिंदू व मुस्लिम यांच्यात फूट पाडून स्वातंत्र्य चळवळ दुर्बल करणे हा होता. म्हणून लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी करायचे ठरवले.
प्रश्न ३ रा : टीपा लिहा.
(१) राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे
➤उत्तर➤राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे भारताच्या निरनिराळ्या भागातील लोकांना धर्म, वंश, जात, भाषा, भौगोलिक प्रदेश असे भेद विसरून एका व्यासपीठावर आणणे, परस्परांच्या समस्या जाणून घेऊन विचारविमर्श करणे, लोकांमध्ये ऐक्य भावना वृध्दिंगत करणे, व राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे ही होती.
(२) वंगभंग चळवळ
➤उत्तर➤ऑक्टोबर १९०५ मध्ये लॉर्ड कर्झनने जनतेच्या विरोधाला प्रतिसाद न देता बंगालच्या फाळणीची योजना अंमलात आणली. त्यामुळे बंगालमधील जनमत अतिशय प्रक्षुब्ध झाले. ब्रिटिश मालावर बहिष्कार टाकायचा, स्वदेशी माल खरेदी करायचा म्हणून एकजुटीने संघर्ष करण्यासाठी लोकांनी शपथा घेतल्या. सरकारी शाळा महाविद्यालयांवर बहिष्कार टाकून असंख्य विद्यार्थी या चळवळीत सामील झाले या चळवळीचे पडसाद सर्व भारतभर उमटले. महाराष्ट्र व पंजाब मधील जनतेने विशेष उत्साहाने बंगालला साथ दिली. वंगभंग
आंदोलनाचे नेतृत्व सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आनंदमोहन बोस, रवींद्रनाथ टागोर इत्यादींनी केले. वंगभंग चळवळीने भारतीय राष्ट्रीय सभेची व्याप्ती वाढली. ही चळवळ राष्ट्रीय चळवळ बनली. यामुळे १९११ साली ब्रिटिशांनी बंगालची फाळणी रद्द केली.
(३) राष्ट्रीय सभेची चतु:सूत्री
➤उत्तर➤ राष्ट्रीय सभेच्या १९०६ च्या अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते. त्यांनी व्यासपीठावरून ‘स्वराज्य’ या शब्दाचा सर्वप्रथम उच्चार केला. याच अधिवेशनात स्वराज्य, स्वदेशी,राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार ही चतुःसूत्री राष्ट्रीय सभेने एकमताने स्वीकारली. स्वदेशी चळवळीमुळे आपण स्वयंपूर्ण व स्वावलंबी होऊ. स्वदेशीच्या मार्गाने जाण्यासाठी आपल्या देशातील भांडवल, साधनसामुग्री, मनुष्यबळ आणि अन्य सर्व शक्ती आपल्याला एकत्रित कराव्या लागतील आणि यातूनच आपल्या देशाचे हित साधता येईल. परदेशी वस्तू व मालावर बहिष्कार ही पहिली पायरी तर परदेशी राजवटीवर बहिष्कार ही पुढची पायरी असे ठरले. बहिष्कारामुळे ब्रिटिश साम्राज्याच्या मुळावर घाव घालता येईल असे नेत्यांचे मत होते.
प्र ४ था : भारतीय राष्टीय सभेच्या स्थापनेची पार्श्ववभूमी पुढील मुद्दे.
(०) प्रशासकीय केंद्रीकरण :
➤➤ब्रिटिश प्रशासनाच्या एकछत्री अंमलामुळे देशभर समान धोरणे, सर्वांना कायद्यासमोर समान दर्जा मिळाला. त्यामुळे लोकांमध्ये एक राष्ट्रीयत्वाची भावना विकसित झाली. ब्रिटिशांनी प्रशासनाच्या सुविधेसाठी रेल्वे, रस्त्यांचे जाळे निर्माण केले. याचा फायदा भारतीयांना होऊन अनेक प्रांतातील भारतीयांचा संवाद वाढला व राष्ट्रभावना वाढीला लागली.
(०) आर्थिक शोषण :
➤➤इंग्लडच्या साम्राज्यवादी धोरणामुळे भारताचे आर्थिक शोषण होऊ लागले. शेतकऱ्यांना नगदी पिके घेण्यास सक्ती, शेतसारा व दुष्काळ यामुळे भारतीय शेतीचा कणा वाकला. पारंपारिक उद्योगधंद्यांचा हास झाल्याने बेकारी वाढली. भांडवलदारांकडून कामगारांचे शोषण होत होते. मध्यम वर्गावर नवीन कर लादल्यामुळे लोकांच्या मनात असंतोष वाढत होता.
(०)पाश्चात्त्य शिक्षण :
➤➤पाश्चात्त्य शिक्षणाच्या प्रसारामुळे न्याय, स्वातंत्र्य, समता, लोकशाही अशा नव्या कल्पनांची भारतीयांना ओळख झाली. बुद्धिनिष्ठा, विज्ञान निष्ठा, मानवता, राष्ट्रवाद अशा मूल्यांच्या आधारावर आपल्या देशाची उन्नती साधावी अशी भावना रुजू लागली. भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या एशियाटिक सोसायटीत अनेक भारतीय व पाश्चिमात्य विद्वानांनी भारतीय संस्कृतीचा अभ्यास सुरू केला. त्यांनी संस्कृत, फारसी आणि अन्य भारतीय भाषांमधील हस्तलिखिते तपासन त्यावरील संशोधने प्रसिद्ध केली. आपल्याला प्राचीन समद्ध वारसा लाभला आहे हे समजल्याने भारतीयांची अस्मिता जागृत झाली.
(०) वृत्तपत्रांचे कार्य :
➤➤वृत्तपत्रे व नियतकालिकांमधून राजकीय व सामाजिक जागृती होऊ लागली. या वृत्तपत्रांमधून सद्य परिस्थितीची जाणीव निर्माण होऊ लागली. दर्पण, प्रभाकर, हिंदू, अमृत बझार पत्रिका, केसरी, मराठा अशा वृत्तपत्रातून सरकारच्या धोरणावर टीका होऊ लागली.
0 Comments