5.वारे
१)हवा प्रसरण पावली, की.................
अ)घन होते.
आ) नाहीशी होते
इ)विरळ होते.
ई)दमट होते.
उत्तर: हवा प्रसरण पावली, की विरळ होते.
२)वारे हवेच्या जास्त दाबाकडून .................
अ)आणखी जास्त हवेच्या दाबाकडे वाहतात.
आ) थंड हवेच्या दाबाकडे वाहतात.
इ)हवेच्या कमी दाबाकडे वाहतात.
ई)आहे तेथेच राहतात.
उत्तर: वारे हवेच्या जास्त दाबाकडून हवेच्या कमी दाबाकडे वाहतात.
३)उत्तर गोलार्धात विषुववृत्ताकडे येणारे वारे पृथ्वीच्या परिवलनामुळे.................
अ)दक्षिणेकडे वळतात.
आ) पूर्वेकडे वळतात.
इ)पश्चिमेकडे वळतात.
ई)उत्तरेकडे वळतात.
उत्तर: उत्तर गोलार्धात विषुववृत्ताकडे येणारे वारे पृथ्वीच्या परिवलनामुळे पश्चिमेकडे वळतात.
४)भारतीय उपखंडावरून वाहणाऱ्या हंगामी वाऱ्यांची दिशा हिवाळ्यात.........
अ)आग्नेयकडून वायव्येकडे असते.
आ) नैऋत्येकडून ईशान्येकडे असते.
इ)ईशान्येकडून नैऋत्येकडे असते.
ई)वायव्येकडून आग्नेयकडे असते.
उत्तर: भारतीय उपखंडावरून वाहणाऱ्या हंगामी वाऱ्यांची दिशा हिवाळ्यात ईशान्येकडून नैऋत्येकडे असते.
५)गरजणारे चाळीस वारे दक्षिण गोलार्धात ..............
अ)विषुववृत्ताकडे वाहतात.
आ)४०० दक्षिण अक्षांशाच्या भागात वाहतात.
इ)ध्रुवीय कमी दाबाच्या प्रदेशाकडून वाहतात.
ई)४०० उत्तर अक्षांशाच्या भागात वाहतात.
उत्तर: गरजणारे चाळीस वारे दक्षिण गोलार्धात ४०० उत्तर अक्षांशाच्या भागात वाहतात.
प्र.२. खालील वर्णनावरुन वाऱ्यांचा प्रकार ओळख
१)नैऋत्येकडून येणारे वारे भारतीय उपखंडावर पाऊस आणतात. जून ते सप्टेंबर या काळात भारतात पाऊस पडतो. या कालावधीनंतर हे वारे परत फिरतात.
उत्तर: नैऋत्य मोसमी वारे
(२) उत्तर ध्रुवीय प्रदेशांकडून ६०° उत्तरेकडे येणाऱ्या या वाऱ्यांमुळेउत्तर अमेरिका, युरोप व रशिया एवढ्या विस्तीर्ण प्रदेशात थंडीची तीव्रता वाढते.
उत्तर: ध्रुवीय वारे
(३) डोंगरमाथे दिवसा लवकर तापतात. तेथील हवा तापून हलकी होते व वर जाते. त्यामुळे या भागात कमी दाब निर्माण होतो. त्याच वेळी डोंगरपायथ्याशी दरीखोऱ्यांत हवा थंड असल्याने जास्त दाब असतो. तेथील हवा कमी दाबाकडे वाहते.
उत्तर: दरिय वारे
प्रश्न ३. पुढे हवेचा दाब क्रमवार मिलिबारमध्ये दिलेला आहे. त्यावरून आवर्त व प्रत्यावर्ताची आकृती काढा.
प्रश्न ४. एकच भौगोलिक कारण लिहा.
(१) विषुववृत्ताजवळ हवेचा पट्टा शांत असतो.
उत्तर:
१)विषुववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस सुमारे ५० अक्षवृतांपर्यंत हवेचा दाब सर्वसाधारणपाने सारखाच असतो. त्यामुळे वर्षतील बराच काळ विषुववृत्ताच्या भागात वारे वाहत नाहीत. म्हणून विषुववृत्तावर हवेचा पट्टा शांत असतो.
(२) उत्तर गोलार्धातील नैॠत्य वाऱ्यांपेक्षा दक्षिण गोलार्धात वायव्येकडून येणारे वारे जास्त वेगाने वाहतात.
उत्तर:
१)दक्षिण गोलार्धामध्ये जलभाग जास्त आहे. या भागात कोणताही अडथला नसल्यामुळे वार्याच्या वेगावर कोणतेही नियंत्र असत नाही.
२)उत्तर गोलार्धामध्ये भूपृष्ठाचा उंचसखलपणाचा अडथळा असल्यामुळे वाऱ्याच्या वेगावर मर्यादा येतात.
त्यामुळे , उत्तर गोलार्धातील नैॠत्य वाऱ्यांपेक्षा दक्षिण गोलार्धात वायव्येकडून येणारे वारे जास्त वेगाने वाहतात.
(३) उन्हाळ्यातील मोसमी वारे समुद्राकडून, तर हिवाळ्यातील परतीचे मोसमी वारे जमिनीकडून येतात.
उत्तर:
१)उन्हाळ्यात जास्त कालावधीसाठी जमिनीचे तापमान अधिक असते. त्यामुळे उन्हाळ्यात जमिनीवरील हवेचा दाब हा समुद्रातील हवेच्या दाबापेक्षा तुलनेने कमी असतो. त्यामुळे उन्हाळ्यातील मोसमी वारे समुद्राकडून येतात.
२)हिवाळ्यात जास्त कालावधीसाठी जमिनीचे तापमान कमी असते. त्यामुळे हिवाळ्यात जमिनीवरील हवेचा दाब हा समुद्रातील हवेच्या दाबापेक्षा तुलनेने जास्त असतो. त्यामुळे हिवाळ्यातील परतीचे मोसमी वारे हे जमिनीकडून समुद्राच्या दिशेने वाहतात.
(४) वारे वाहण्यासाठी हवेच्या दाबामध्ये फरक असावा लागतो.
उत्तर:
१)हवेच्या दाबामध्ये फरक नसेल तर हवेची हालचाल होत नाही.
२) जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे हवेची हालचाल क्षितीजसमांतर दिशेत होते. या हालचालीमुळे वाऱ्याची निर्मिती होते.
म्हणून वारे वाहण्यासाठी दाबामध्ये फरक असावा लागतो.
प्रश्न.५. पुढील ओघतक्ता पूर्ण करा.
प्रश्न ६. थोडक्यात उत्तरे लिहा.
(१) ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धांत हवेचा दाब जास्त का असतो?
उत्तर:
1) ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धामधील तापमान हे वर्षभर ००c पेक्षा ही कमी असते.
2) त्यामुळे या ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धात हवा थंड असते व त्यामुळे हवेची घनता जास्त असते.
म्हणून , ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धात हवेचा दाब जास्त असतो.
(२) पृथ्वीच्या परिवलनाचा वाऱ्यांवर कोणता परिणाम होतो?
उत्तर:
१) पृथ्वीच्या परिवलनामुळे उत्तर गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेच्या डावीकडे वळतात. तर दक्षिण गोलार्धात हे वारे मूळ दिशेच्या डावीकडे वळतात.
अशा प्रकारे पृथ्वीच्या परिवलनाचा वाऱ्यांवर परिणाम होतो.
(३) आवर्त वारे चक्राकार दिशेनेच का वाहतात.
उत्तर:
१) एखाद्या ठिकाणी हवेचा दाब कमी असतो व सभोवताली हवेचा दाब जास्त असतो, तेव्हा आवर्त वाऱ्यांची परिस्थिती निर्माण होते.
२) कमी हवेच्या दाबाचे क्षेत्र हे मध्यभागी असल्याने सभोवतालच्या प्रदेशातील जास्त हवेच्या दाबाकडून वेगाने वारे वाहतात.
त्यामुळे आवर्त वारे हे चक्राकार दिशेनेच वाहतात.
(४) आवर्त वाऱ्यांची कारणे व परिणाम लिहा.
उत्तर:
१) एखाद्या ठिकाणी हवेचा दाब कमी झाल्यास तसेच सभोवताली हवेचा दाब जास्त असणे या कारणामुळे आवर्त वाऱ्यांची परिस्थिती निर्माण होते.आवर्त वाऱ्यांचे परिणाम पुढील प्रमाणे होतात.
2) आवर्त वाऱ्यांमुळे आकाश ढगाळलेले राहते.
3) आवर्त वारे अत्यंत वेगाने वाहत असल्यामुळे भरपूर पाऊस पडतो.
4) काही प्रसंगी विनाशकारी आवर्त वाऱ्यांमुळे किनाऱ्यालगतच्या प्रदेशांत जीवितहानी व वित्तहानी होते.
0 Comments