23.परिवर्तन विचारांचे

 


प्र. १. चार ते पाच वाक्यांत उत्तरे लिहा.




(अ)        अजय अस्वस्थ का झाला?

उत्तर: सकाळी सहलीलाला जायची तयारी करत असताना भिंतीवरची पाल चूकचुकली. घराबाहेर पडत असताना मांजर आडवे गेले. सहलीच्या प्रवासाला सुरुवात झाल्यावर पाच-सहा किलोमीटर प्रवास झाल्यावर बस चा टायर पंक्चर झाला. बसमधून उतरताना मित्राचा पाय मुरगळला. त्यामुळे अजय अस्वस्थ झाला.


(आ)     कोणताही वार हा वाईट नसतो हे सरांनी अजयला कसे पटवून दिले?

उत्तर: कोणताही वार वाईट नसतो हे समजावून सांगताना सर अजयला म्हणाले , जेव्हा आपण काही खात असतो तेव्हा आवाज होतो तसाच आवाज जेव्हा पाल काहीतरी खात असते तेव्हा आपल्याला येतो. मांजर सजीव म्हंटल्यावर ते इकडून तिकडे फिरणारच. बसच्या तयार ला काही अणकुचीदार रुतल्याने बस पंक्चर होते. अपशकून वगैरे काही नसतो. कोणताही दिवस वाईट नसतो सगळेच दिवस चांगले असतात.


(इ)            कोणत्या दिवसाला किंवा वाराला वाईट म्हटले पाहिजे असे सर म्हणतात?

उत्तर: ज्या दिवशी आपण वाईट काम करू, दुसऱ्याला त्रास होईल असे वर्तन करू किंवा दुसऱ्याची मने दुखवू तो दिवस, तो वार वाईट म्हटला पाहिजे असे सर म्हणतात.


 प्र. २. अजयचे मत परिवर्तन कसे झाले ते सविस्तर लिहा.

उत्तर: अजय सहलीसाठी निघाला होता . सकाळी तयार करताना पाल चूकचुकणे, घरातून बाहेर पडताना मांजर आडवे जाणे, सहलीच्या बस चा टायर पंक्चर होणे, मित्राचा पाय मुरगळणे अशा घटना घडल्या या घटनांना अजय आई अपशकून मानते. हे विचार अजय मनात घोळू लगले आणि अजय अस्वस्थ झाला. त्याने त्याच्या मनातील शंका सरांना बोलून दाखवली. संध्याकाळी सहलीहून घरी परतल्यावर सरांनी राजूला समजावले दिवसा घडलेल्या घटनांमागील शास्त्रीय कारणे कोणती आहेत ती समजावून सांगितली. कोणताही दिवस वाईट नसतो हे सरांचे म्हणणे अजय ला पटले. आपण किती अशास्त्रीय विचार करतो हे त्याला जाणवले. अशा प्रकारे अजय चे मतपरिवर्तन झाले.


प्र. ३. कोण, कोणास व का म्हणाले ते सांगा.




(अ)        ‘आपली सहल नीट पार पडेल ना ?’

उत्तर: असे, अजय सरांना म्हणाला.




(आ)     ‘तू तर विज्ञानाचा अभ्यास करणारा विद्यार्थी आहेस.’

उत्तर: असे, सर अजयला म्हणाला.


खेळूया शब्दांशी.




(अ) खालील वाक्प्रचारांचा वाक्यांत उपयोग करा.


(अ) मैदान गाजवणे.

उत्तर: केदारने धावण्याच्या शर्यतीत मैदान गाजवले.




(आ) एका पायावर तयार असणे.

उत्तर: राजू कोणतेही काम करण्यासाठी कायम एका पायावर तयार असतो.




(इ)    कपाळावर आठ्या पसरणे.

उत्तर: जेवणात आवडीची भाजी नसलेली पाहून मीना च्या कपाळावर आठ्या पसरल्या


(ई)            मन खट्टू होणे.

उत्तर: यावर्षी सुट्टीत बाहेर फिरायला जायला मिळणार नाही हे ऐकताच सिराज चे मन खट्टू झाले.

 


(आ)खालील शब्द वाचा व लिहा.


चलबिचल, कावराबावरा, अघळपघळ, चटकमटक, ओबडधोबड, अवतीभवती, शेजारीपाजारी, आरडाओरडा, मोडतोड, जाडाभरडा, संगतसोबत, इडापिडा, टंगळमंगळ, अचकटविचकट, अदलाबदल, जडणघडण,अक्राळविक्राळ, उपासतापास, ठाकठीक, शेतीभाती.


उत्तर: चलबिचल, कावराबावरा, अघळपघळ, चटकमटक, ओबडधोबड, अवतीभवती, शेजारीपाजारी, आरडाओरडा, मोडतोड, जाडाभरडा, संगतसोबत, इडापिडा, टंगळमंगळ, अचकटविचकट, अदलाबदल, जडणघडण,अक्राळविक्राळ, उपासतापास, ठाकठीक, शेतीभाती.


 

(इ)   ‘बिन’ हा उपसर्ग लावून तयार झालेले शब्द खालील आकृतीत दिले आहेत. हे शब्द अभ्यासा. त्यानुसार ‘गैर’ हा उपसर्ग लावून तयार होणारे शब्द पुढील आकृत्यांमध्ये लिहा.

उत्तर: बिन: १)बिनबुडाचा


                २)बिनधास्त


                ३) बिनदिक्कत


                ४)बिनचूक


                ५)बिनडोक


                ६)बिनतक्रार


                ७) बिनहरकत



गैर :         १) गैरहजर


                २)गैरफायदा


                ३)गैरसमज


                ४) गैरवर्तन


                ५)गैरसोय


                ६)गैरवाजवी


                ७)गैरप्रकार


 

(ई)       ‘झपझप’ या शब्दातून चालण्याची रीत समजते. तसे खालील शब्दांतून कोणत्या क्रियेची रीत समजते ते लिहा.

उत्तर:


१. भरभर


चालणे, खाणे, बोलणे, आवरणे.


२. फाडफाड


भांडणे, बोलणे, वाचणे.


३. धपधप


वाजणे , मारणे.


४. पटपट


चालणे, बोलणे, करणे, खाणे, पिणे.


५. धाडधाड


बोलणे, वाजणे, जाणे, येणे.


Post a Comment

0 Comments