4.श्रावणमास (कविता)



प्र. १. खालील प्रसंगी काय घडते ते लिहा.
 

प्रसंग

काय घडते

१)पहिला पाऊस आल्यावर

१)पहिला पाऊस आल्यावर मातीच्या सुगंध दरवळतो, हवेत गारवा निर्माण होतो, सारी सृष्टी प्रफुल्लीत होऊन जाते, लहान मुले पहिल्या पावसात भिजून पावसाचा आनंद घेतात. पहिला पाऊस साऱ्या सृष्टीला हवा हवासा वाटतो.

२) सरीवर सारी कोसळल्यावर

१)सरीवर सरी कोसळल्यावर नदी नाले तुडूंब भरून वाहू लागतात. शेतीच्या कामाला वेग येतो. प्राणीमात्रांना मुबलक प्रमाणात पाणी मिळते.

प्र. २. निरीक्षण करा व लिहा.


श्रावण महिन्यातले तुम्ही

पाहिलेले आकाशातील विशेष बदल

 

उत्तर:

१) श्रावणात पाऊस पडत असताना क्षणात उन पडते.

२) अचानक आकाश काळ्या ढगांनी भरून जाते.

३) श्रावण महिन्यात आकाशात इंद्रधनुष्य दिसते.

४) क्षणात सूर्य ढगामागून डोकावतो.

५) श्रावण महिन्यातील उन्हे हे कोवळी असतात.

 



प्र. ३. खालील तक्ता पूर्ण करा.

उत्तर:

कवितेत आलेली यांची नावे

प्राणी : १) हरीण , पाडस, खिल्लारे

पक्षी : १) बगळे, पाखरे

फुले : १) पारिजातक , केवडा, सोनचाफा

प्र. ४. ‘सुंदर बाला या फुलमाला’ या काव्यपंक्तीत सारख्या अक्षराचा उपयोग अधिक केल्यामुळे नाद निर्माण होतो, त्यामुळे पंक्ती गुणगुणाव्याशा वाटतात. कवितेतील अशा ओळी शोधून लिहा.
उत्तर:

१. श्रावणमासी हर्ष मानसी

२. तरुशिखरांवर, उंच घरांवर

३. उतरुनि येती अवनीवरती

४. सुंदर हरिणी हिरव्या कुरणी

 

 

प्र. ५. कवितेतील खालील अर्थाच्या ओळी लिहा.
 

(अ) क्षणात पाऊस पडतो तर क्षणात ऊन पडते.

उत्तर:

        क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे.

 

(आ) झाडांवर, घरांवर कोवळे कोवळे ऊन पडते.

उत्तर:

        तरुशिखरांवर, उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे.

 

(इ) हरिणी आपल्या पाडसांसह कुरणात बागडत आहेत.

उत्तर:

        सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती.

 



प्र. ६. कवितेच्या खालील ओळींतील भाव तुमच्या शब्दांत लिहा.
 

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे;
 क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे.
उत्तर: श्रावण महिन्यामध्ये सारी सृष्टी प्रफुल्लीत होऊन जाते. श्रावण महिना आल्यावर सर्वांचे जीवन आनंदाने भरून जाते. श्रावण महिन्यामध्ये सगळीकडे हिरवळ असते. जणू काही धरतीने हिरवा शालूच पांघरला आहे. श्रावण महिन्यामध्ये उन-पावसाचा खेळ चालू असतो. पाऊस पडत असतानाच अचानक मध्ये उन पडते.

खेळूया शब्दांशी

 

खालील शब्दांसाठी कवितेत आलेले समानार्थी शब्द शोधून लिहा.
 

(१) बासरी – पावा

(२) स्त्रिया – ललना

(३) आकाश – नभ  

(४) मेघ – जलद

(५) गुराखी – गोप

(६) पृथ्वी – अवनी

(७) वृक्ष – तरू

(८) मुख – वदन

(९) राग – रोष

 

 

खेळ खेळूया.

 

खाली समानार्थी शब्दांचा जिना दिला आहे. दिलेल्या चौकटीत आडवे-उभे शब्द भरायचे आहेत. एका जिन्याच्या पायऱ्या तुम्हांला उतरून दाखवल्या आहेत. दुसऱ्या जिन्याच्या पायऱ्या तुम्हांला उतरायच्या आहेत.
(१) मस्तक

(२) कचरा

(३) रात्र

(४) पाणी

(५) जनता

(६) मुलगी


लिहिते होऊया.

 

श्रावण व वैशाख या दोन्ही महिन्यांतील निसर्गात जाणवणारा फरक तुमच्या शब्दांत लिहा
उत्तर:

 

वैशाख

श्रावण

१)वैशाख महिन्यात कडक उन असते.

१)श्रावण महिन्यामध्ये हवेत गारवा असतो

२.नदी नाले सुकून जातात

२.नदीनाले भरून वाहतात.

३.पाण्याअभावी पशु-पक्षांचा जीव कासावीस होतो.

३.पशु-पक्षांना मुबलक प्रमाणात पाणी मिळते.

४.सगळीकडे ओसाड जमीन दिसते.

४.सर्व धरती हिरवीगार होऊन जाते. 

 

 

चला संवाद लिहुया.

 

पाऊस व छत्री या दोघांमधील संवादाची कल्पना करा व लिहा, हा संवाद वर्गात सादर करा.

पाऊस : उन्हामुळे तापलेल्या धरतीला गारवा मिळावा; म्हणून मी दरवर्षी येवढ्या लांबून धरतीवर येतो आणि तू मला अशी मध्येच रोखतेस.

छत्री : अरे पाऊस दादा मी तुला काही अडवत नाही, मी फक्त माझा मालक म्हणजे माणसे भिजू नयेत एवढीच काळजी घेते.

पाऊस : पण मी वर्षांतून ४ महिने धरतीवर येतो , सारे पशु-पक्षी सारी सृष्टी माझ्या सरींतून न्हाऊन निघते मग माणसांनी पण मनमुराद भिजून घ्याव.

छत्री : अरे पाऊस दादा, ही माणसे जर तुझ्या सरींमध्ये भिजली तर ती आजारी पडतील आणि त्यांचे आरोग्य बिघडेल.

पाऊस : हो तुझे म्हणणे देखील बरोबर आहे. पण मला सांग तू माझ्या सरींमध्ये माणसाचं रक्षण करताना तू तर चिंब भिजून जातेस.

छत्री : खर सांगू वर्षभर मला अडगळीच्या खोलीत पडून राहून कंटाळा येतो तुझ्या सरींमध्ये भिजल्यावर मला आनंद मिळतो.

पाऊस : असं होय !

छत्री : तू माझी काळजी करू नको , तू या साऱ्या सृष्टीला अनमोल अशा पाण्याचा पुरवठा करत रहा. मी या माणसांचे संरक्षण करण्याचे काम करते.

पाऊस : हो, आपण दोघांनीही आपापली काम चोखपणे पूर्ण करूयात.



Post a Comment

Previous Post Next Post

Ad

Ad

نموذج الاتصال