(१) भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार …………. येथे आहे.
(अ) पुणे
(ब) नवी दिल्ली
(क) कोलकता
(ड) हैदराबाद
उत्तर :- (ब) नवी दिल्ली
(२) दृकश्राव्य साधनांमध्ये ………. या साधनाचा समावेश होतो.
(अ) वृत्तपत्र
(ब) दूरदर्शन
(क) आकाशवाणी
(ड) नियतकालिके
उत्तर :- (ब) दूरदर्शन
(३) भौतिक साधनांमध्ये म्हणी चा समावेश होत नाही.
(अ) नाणी
(ब) अलंकार
(क) इमारती
(ड) म्हणी
उत्तर :- (ड) म्हणी
(ब) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा.
व्यक्ती विशेष जाल कूपर – टपाल तिकीट अभ्यासक
कुसुमाग्रज – कवी
अण्णाभाऊ साठे – लोकशाहीर
अमर शेख – चित्रसंग्राहक
उत्तर :- अमर शेख – चित्रसंग्राहक (कारण अमर शेख हे एक शाहीर होते )
२. टीपा लिहा.
(१) लिखित साधने :
उत्तर :- वत्तपत्रे, नियतकालिके, रोजनिशी, ग्रंथ, पत्रव्यवहार, अभिलेखागारातील कागदपत्रे, सरकारी गॅझेट, टपाल तिकिटे इत्यादींचा लिखित साधनांमध्ये समावेश होतो. या साधनांच्या साहाय्याने आपल्याला ऐतिहासिक घडामोडी, सामाजिक घडामोडी, राजकीय घडामोडी, सामाजिक चळवळी, सांस्कृतिक जीवन, प्रशासकीय धोरणे, सामाजिक परंपरा, समाजाची प्रगती इत्यादींबद्दल संपूर्ण माहिती समजून घेता येते. म्हणूनच इतिहासाच्या साधनांमध्ये लिखित साधने ही जास्त महत्वाची आहेत.
(२) प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया १९५३ :
उत्तर :- नंतर भारतातील बहुसंख्य वृत्तपत्रांसाठी सर्व महत्त्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील, महत्त्वाच्या विषयांवरील लेख यांसाठी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया हा महत्त्वाचा स्त्रोत आहे. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने वृत्तलेख, छायाचित्रे, आर्थिक, वैज्ञानिक विषयांवरील लेख वृत्तपत्रांना पुरवलेले आहेत. आता प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया म्हणजेच पीटीआयने ऑनलाइन सेवा सुरू केली आहे. १९९० च्या दशकात पीटीआयने टेलिप्रिंटर्सऐवजी ‘उपग्रह प्रसारण तंत्राद्वारे देशभर बातम्या पाठवायला सुरुवात केली. आधुनिक भारताच्या इतिहास लेखनासाठी हा मजकूर महत्त्वाचा आहे.
प्रश्न ३ रा : करणे लिहा.
(१) टपाल खाते टपाल तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा व एकात्मता यांच्या जतनाचे प्रयत्न करते.
उत्तर :- भारत स्वतंत्र झाल्यापासून ते आजतागायत टपाल तिकीटांमध्ये विविध बदल घडून आलेले आहेत. तिकिटांच्या आकारांतील वैविध्य, विषयांतील नावीन्य, रंगसंगती यांमुळे टपाल तिकिटे आपणांस बदलत्या काळाविषयी सांगत असतात. टपाल खाते राजकीय नेत्यांवर, फुलांवर, प्राणी-पक्ष्यांवर, एखाद्या घटनेच्या रौप्य, सुवर्ण, अमृतमहोत्सव, शतक, द्विशतक, त्रिशतकपूर्ती निमित्त तिकिट काढते. तो इतिहासाचा मौल्यवान ठेवा असतो. अशाप्रकारे टपाल खाते टपाल तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा व एकात्मता यांच्या जतनाचे प्रयत्न करत असतो.
(२) आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दक-श्राव्य माध्यमे महत्वाची असतात.
उत्तर :- दूरदर्शन, चित्रपट, आंतरजाल इत्यादी साधनांना ‘दृक-श्राव्य साधने’ असे म्हणतात. या साधनांद्वारे चालू घडामोडींचे चित्रीकरण करता येते. सामाजिक, राजकीय, कला, साहित्य, क्रीडा, महोत्सव, ऐतिहासिक वास्तु समाजकारण, शैक्षणिक बदल या सर्वांचे चित्रीकरण झाल्याने त्या घटना आपल्याला पुन्हा पुन्हा पाहता व ऐकता येतात. वृत्तपट, बोधपट, नाटिका इत्यादीमुळे इतिहास पुन्हा पुन्हा जिवंतपणे जशाचा तसा अभ्यासता येतो. म्हणूनच आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृक-श्राव्य माध्यमे महत्वाची असतात.