(१) इ.स.१४५३ मध्ये ऑटोमन तुर्कानी _______ हे शहर जिंकून घेतले.
(अ) व्हेनिस
(ब) कॉन्स्टेंन्टिनोपल
(क) रोम
(ड) पॅरिस
➤उत्तर➤ कॉन्स्टन्टिनोपल
(२) औद्योगिक क्रांतीला प्रारंभ _______ मध्ये झाला.
(अ) इंग्लंड
(ब) फ्रान्स
(क) इटली
(ड) पोर्तुगाल
➤उत्तर➤इंग्लंड
(३) इंग्लडच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न याने केला.
(अ) सिराज उद्दौला
(ब) मीर कासीम
(क) मीर जाफर
(ड) शाहआलम
➤उत्तर➤ मीर कासीम
प्रश्न २ रा : पुढील संकल्पना स्पष्ट करा.
(१) वसाहतवाद :
वसाहतवाद म्हणजे आर्थिक व लष्करीदृष्ट्या बलशाली देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश व्यापणे आणि त्या ठिकाणी आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे होय. वसाहतवाद हा साम्राज्यवादाचाच एक विशेष आविष्कार आहे. दुसऱ्या प्रदेशात वा देशात वस्ती केल्यानंतर त्या प्रदेशातील लोकांत आपला संघटित गट तयार करून आपले वर्चस्व प्रस्थापिणे, ही त्या पुढची प्रक्रिया.या प्रक्रियेला वसाहतवादी प्रवत्ती म्हणतात. युरोपीय देशांच्या याच वसाहतवादी प्रवृत्तीतून साम्राज्यवाद उदयास आला.
थोडक्यात सांगायचे तर वसाहतवाद म्हणजे एखाद्या राज्याच्या लोकांद्वारे दुसऱ्या प्रदेशात जागा बळकावणे, तिथे स्वतःच्या वसाहती स्थापित करणे, त्या टिकवून ठेवणे, त्यांचा विस्तार करणे. जमीनीचे, खनिजांचे, नैसर्गिक साधनांचे व स्थानिक लोकांचे शोषण करून स्वतःच्या राज्याची समृद्धी वाढविणे.
(२) साम्राज्यवाद :
साम्राज्यवाद म्हणजे विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रांवर आपले सर्वागीण वर्चस्व प्रस्थापित करणे व अनेक नव्या वसाहती स्थापन करणे होय. साम्राज्यवादात एखादाबलाढ्य देशदुसन्या कमकुवत देशाच्या मोठ्या भूभागावर अधिपत्य प्रस्थापित करून तो भूभाग आपल्या नियंत्रणाखाली आणतो. साम्राज्यवादासाठी बहधा लष्करी बळाचा वापर केला जातो. नव्या भूभागांवर वसाहती स्थापन करणे हे देखील साम्राज्यवादाचेच उदाहरण आहे. आशिया व आफ्रिका खंडातील अनेक राष्ट्रे युरोपीय राष्ट्रांच्या या साम्राज्यवादी
महत्त्वकांक्षेला बळी पडली.
(३) प्रबोधनयुग :
युरोपातील मध्ययुगाच्या अखेरच्या कालखंडाला अर्थात इ.स.१३ वे शतक ते १६ वे शतक प्रबोधनयुग म्हणून ओळखले जाते. युरोपात या कालखंडात प्रबोधन, धर्मसुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध
या घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला. म्हणून या काळाला प्रबोधनयुग असे म्हणतात. प्रबोधनयुगात युरोप कला, स्थापत्य, तत्त्वज्ञान या क्षेत्रांत ग्रीक व रोमन परंपरांचे पुनरुज्जीवन घडून आले. प्रबोधनाने मानवतावादाला आणि जीवनाच्या सवांगीण प्रगतीला चालना दिली.
(४) भांडवलशाही :
ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची सूत्रे भांडवलदाराच्या हातात असतात ती अर्थव्यवस्था ‘भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते. देशकालपरत्वे या अर्थव्यवस्थेच्या स्वरुपात काही फरक आढळून येतात. तात्विकदृष्ट्या ज्या अर्थव्यवस्थेचे पूर्णत: भांडवलशाही असे वर्णन करता येईल ती भांडवलशाही. औद्योगिक क्रांतीनंतर भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उदय युरोपीय देशात झाला.
प्रश्न ३ रा : पुढील विधाने सकारण स्पष्ट करा,
(१) प्लासीच्या लढाईत सिराज उद्दौलाचा पराभव झाला.
➤कारण➤ भारतातील अत्यंत समद्ध अशा बंगाल प्रांतात इ.स.१०५६ साली सिराज उद्दौला हा नवाबपदी आला. मुघल बादशाहाकडून बंगाल प्रांतात मिळालेल्या व्यापारी सवलतीचा ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी गैरवापर करत. इंग्रजांनी नवाबाची परवानगी न घेता कोलकाता येथील आपल्या वखारीभोवती तटबंदी उभारल्यामुळे सिराज उद्दौलाने इंग्रजांवर चाल करून कोलकात्याची वखार काबीज केली. या घटनेने इंग्रजांमध्ये असंतोष निर्माण झाला. रॉबर्ट क्लाईव्ह याने मुत्सद्देगिरीने नवाबाचा सेनापती मीर जाफर यास नवाब पदाचे आमिष दाखवून आपल्या बाजूने वळवले. इ.स.१७५० मध्ये प्लासी येथे नवाब सिराज उद्दौला व इंग्रज सैन्याची गाठ पडली. त्यावेळी मीर जाफरच्या नेतृत्वाखाली नवाबाचे लष्कर युद्धात उतरले नाही. त्यामुळे प्लासीच्या लढाईत सिराज उद्योलाचा पराभव झाला.
(२) युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले.
➤कारण➤ इ.स.१४५३ मध्ये ऑटोमन तुर्कानी बायझन्टाइन साम्राज्याची राजधानी असलेले कॉन्स्टेंन्टिनोपल जिंकून घेतले. या शहरातून आशिया व युरोप यांना जोडणारे खुश्कीचे व्यापारी मार्ग जात असे. हे व्यापारी मार्ग तुर्कानी बंद केले. त्यामुळे युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले.
(३) युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले.
➤कारण➤ नव्या सागरी मार्गाच्या शोधानंतर युरोप व आशियाई देशांमधील व्यापाराच्या नव्या पर्वाला सुरूवात होऊन अनेक व्यापारी पुढे आले. परंतु एकट्या व्यापान्यास जहाजातून माल परदेशात पाठवणे शक्य नसल्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन व्यापार सुरू केला. यातूनच भागभांडवल असणाऱ्या अनेक व्यापारी कंपन्या उदयास आल्या. पौर्वात्य देशांशी होणारा व्यापार फायदेशीर असल्यामुळे या व्यापारातून देशांची आर्थिक भरभराट होत असे. त्यामुळे युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले.
0 Comments