भाषा - मराठी
राजा ज्ञानसेनच्या दरबारात दररोज शास्त्रार्थ केला जात असे. विद्वान लोक तेथे शास्त्रासंबंधी चर्चा करण्यासाठी येत असत. जे विद्वान लोक शास्त्रात पारंगत किंवा वादविवादात जिंकत असत ते विजयी म्हणून घोषित केले जात असत त्यांना राजा धन आणि मान देऊन सन्मानित करत असे. एक दिवस राजा ज्ञानसेनाच्या दरबारात असाच शास्त्रार्थ चालला होता. त्या सभेत पंडित भारवी याला विजयी घोषित करण्यात आले. राजाने त्याचा भरसभेत सत्कार केला व मान देण्यासाठी त्याची हत्तीवरून मिरवणूक काढली. त्याच्या विद्वत्तेच्या सन्मानार्थ राजा स्वत: त्याला चव-या ढाळत त्याला घरापर्यंत सोडण्यास आला. भारवी एवढ्या मोठ्या सन्मानाने घरी आला हे पाहून भारवीच्या आईवडीलांना आकाश ठेंगणे झाले. घरी आल्याबरोबर भारवीने मातेला साष्टांग नमस्कार केला पण पित्याला मात्र उपेक्षेने उभ्याउभ्याच नमस्कार केला. त्याच्या वर्तनात हे साफ दिसून येत होते की जणू काही पित्याला हे सुचवित होता बघा माझा किती सन्मान झाला आहे, माझ्या ज्ञानाला किती किंमत मिळते आहे, स्वत: राजा हत्तीवर चव-या ढाळत मला सोडायला घरी आला आहे. पित्याने त्याच्या त्याही नमस्काराचा स्वीकार केला आणि त्याला चिरंजीवी भव असे म्हटले. गोष्ट इथेच संपली असे नाही. मात्यापित्यांला हे भारवीचे वागणे खटकले. ते दोघेही उदास राहू लागले. भारवीच्या यशाने ते जेवढे आनंदी राहायला पाहिजे होते तितके ते आनंदी नव्हते. याचे कारणही स्पष्ट होते की भारवीला यश पचविता आले नव्हते व तो ते आईवडीलांना दर्शवित होता. तो यशाच्या धुंदीत शिष्टाचार आणि विनम्रतेला विसरून गेला होता. थोड्या दिवसांनी माता आणि पित्याला उदास पाहून भारवीने मातेला याचे कारण विचारले असता माता म्हणाली,’’ तू विजयी होऊन आलास हे ठीक आहे, पण तू विजयी होण्यासाठी तुझ्या वडीलांनी घेतलेले परिश्रम तू विसरलास. तू शास्त्रार्थ करायला जाणार होतास त्याआधी दहा दिवस तुझ्यासाठी निर्जळी उपवास केले होते व त्या काळात ते परमेश्वराकडे एकच मागणे मागत होते माझ्या मुलाला यश मिळवून दे. लहानपणापासून केवळ तुझ्या यशासाठी त्यांनी कितीतरी स्वत:च्या इच्छा दाबून ठेवल्या व तुला शास्त्रपंडीत बनविले आणि केवळ एकाच यशाने उन्मत्त होऊन तू त्यांची उपेक्षा केलीस हेच आम्हा दोघांच्या खिन्नतेचे कारण आहे.’’ हे ऐकताच भारवीला आपली चूक समजली त्याने मातापित्याच्या चरणावर अक्षरश: लोळण घेतली. अनेकवेळा क्षमायाचना केली व आयुष्यात पुन्हा कधीही त्याने मातापित्यांची सेवा करण्यात कसूर केली नाही.
तात्पर्य :- आयुष्यात आपल्याला कितीही मोठी यशाची शिखरे पादाक्रांत करण्यास मिळाली तरी त्यापाठीमागे आपल्या आईवडीलांची पुण्याई असते हे प्रत्येकानेच समजून घेतले पाहिजे. यश कितीही मिळाले तरी उन्मत्त होऊ नये कारण विद्या ही नेहमी विनय असणा-यांकडेच शोभून दिसते.
भाषा - English
Vidya Vinayen adorns
In the court of King Gnanasena, Sastrartha was performed every day. Scholars used to come there for discussions on scriptures. Scholars who excelled in the sciences or won in debates were declared victorious and were honored by the king with wealth and honor. One day a similar scholar was walking in the court of King Gnanasena. Pandit Bharvi was declared the winner in that meeting. The king entertained him in the assembly and took out a procession on an elephant to pay his respects. In honor of his wisdom, the king himself came to drop him home. Bharvi's parents were overjoyed to see Bharvi come home with such great honor. As soon as she came home, Bharvi prostrated to her mother but neglected to bow to her father. It was evident in his demeanor as if to suggest to his father, Look how honored I am, how much my knowledge is valued, that the king himself has come home to drop me off after tasting the elephant. The father accepted his salutations and addressed him as Chiranjeevi Bhava. It does not end here. Bharvi's behavior shocked the parents. Both of them became depressed. He was not as happy as he should have been with Bharvi's success. The reason for this was also clear that Bharvi could not digest the success and was showing it to his parents. He had forgotten manners and modesty in the rush of success. After a few days, Bharvi saw mother and father sad and asked her why, mother said, "It is good that you have come victorious, but you have forgotten the hard work done by your father for you to become victorious."Before you were going to do science, you were fasting for ten days without water and during that time they were asking only one request to the Lord to make my son successful. Since childhood, they suppressed many of their own desires just for your success and made you a scholar and you neglected them because of only one success, which is the reason for our sadness. . He apologized many times and never failed to serve his parents again in his life.
Meaning :- No matter how much success we get in life, everyone should understand that behind it is the virtue of their parents. No matter how much success you get, don't get mad because learning always suits the humble.
भाषा - हिंदी
विद्या विनयेन शोभायमान
राजा ज्ञानसेन के दरबार में प्रतिदिन शास्त्रार्थ किया जाता था। वहाँ विद्वान लोग शास्त्रार्थ के लिये आया करते थे। जो विद्वान विज्ञान में उत्कृष्ट प्रदर्शन करते थे या वाद-विवाद में जीत हासिल करते थे, उन्हें विजयी घोषित किया जाता था और राजा उन्हें धन और सम्मान से सम्मानित करते थे।एक दिन ऐसा ही एक विद्वान राजा ज्ञानसेन के दरबार में घूम रहा था। उस बैठक में पंडित भारवि को विजेता घोषित किया गया। राजा ने सभा में उनका सत्कार किया और उनके सम्मान में हाथी पर जुलूस निकाला।उनकी बुद्धिमत्ता के सम्मान में राजा स्वयं उन्हें घर तक छोड़ने आये। भारवी के माता-पिता भारवी को इतने बड़े सम्मान के साथ घर आया देखकर बहुत खुश हुए।घर आते ही भारवि ने अपनी मां को तो प्रणाम किया लेकिन पिता को प्रणाम करना नजरअंदाज कर दिया।उसके व्यवहार से ऐसा प्रतीत हो रहा था मानो वह अपने पिता को सुझाव दे रहा हो, देखो मैं कितना सम्मानित महसूस कर रहा हूँ, मेरे ज्ञान का कितना मूल्य है, कि हाथी का स्वाद चखने के बाद राजा स्वयं मुझे छोड़ने घर आये हैं। पिता ने उनका अभिवादन स्वीकार किया और उन्हें चिरंजीवी भवः कहकर संबोधित किया।बात यहीं ख़त्म नहीं होती. भारवी के व्यवहार से माता-पिता सदमे में थे। दोनों उदास हो गये. भारवी की सफलता से वह उतना खुश नहीं था जितना उसे होना चाहिए था। इसकी वजह भी साफ थी कि भारवी इस सफलता को पचा नहीं पा रहे थे और इसे अपने माता-पिता को दिखा रहे थे. सफलता की दौड़ में वह शिष्टाचार और शील भूल गया था। कुछ दिनों के बाद भारवि ने मां और पिता को उदास देखा और कारण पूछा तो मां ने कहा, 'यह अच्छा है कि तुम जीतकर आए हो, लेकिन तुम विजयी होने के लिए अपने पिता द्वारा की गई कड़ी मेहनत को भूल गई हो।'इससे पहले कि आप विज्ञान की पढ़ाई करने जा रहे थे, आप दस दिनों तक बिना पानी के उपवास कर रहे थे और उस दौरान वे भगवान से एक ही प्रार्थना कर रहे थे कि मेरे बेटे को सफल बनाना।बचपन से ही उन्होंने आपकी सफलता के लिए अपनी कई इच्छाओं को दबाकर आपको विद्वान बना दिया और आपने केवल एक सफलता के कारण उनकी उपेक्षा कर दी, जो हमारे दुःख का कारण है।. उन्होंने कई बार माफ़ी मांगी और जीवन में फिर कभी अपने माता-पिता की सेवा करने में असफल नहीं हुए।
अर्थ :- हमें जीवन में चाहे कितनी भी सफलता मिले, हर किसी को यह समझना चाहिए कि इसके पीछे उनके माता-पिता का पुण्य है। चाहे आपको कितनी भी सफलता मिले, निराश मत होइए क्योंकि सीखना हमेशा विनम्र व्यक्ति को ही शोभा देता है।
0 Comments